मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आजपासून मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी पालन केले.
यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भोंगे ही खरी समस्या नसल्याचे म्हटले आहे. रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घातली तरच शांतता निर्माण होतील, असेही राणे यांनी ट्विट करत म्हणले आहे.
नितेश राणे यांचे ट्विट
‘खरे मुस्लिम कधीही त्याच्या राज्याच्या किंवा देशाच्या विरोधात जाणार नाही! हिंदू आणि इतरांइतकेच त्यांचे आमच्या मातीवर प्रेम आहे. रझा अकादमी आणि पीएफआय सारख्या संस्था ज्या समाजाचा राग आणि द्वेष पसरवण्यासाठी वापरतात. अमरावती आणि नांदेडमधील दंगली हे त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे आता त्यांना संपवण्याची हीच वेळ आहे
A real Muslim will never go against his state or country!
They love our soil as much as the Hindus and others..
It’s organisations like Raza academy n PFI who use the community to spread anger n hate..
Amravati n Nanded riots r best example of this..
It’s time to finish them!— nitesh rane (@NiteshNRane) May 4, 2022