मुंबई – काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि राज्यातील राजकीय वातावरणच बदलून गेले. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर रोज आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. बंडखोर शिंदे गटातील नेत्यांना खोक्यांचे आमिष दाखवले गेले असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीत आता भाजपच्या एका नेत्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी जवळपास १०० फोन केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला. तर भाजप नेते निलेश राणे यांनी सुद्धा भास्कर जाधवांवर जहरी टीका केली आहे. ‘तुझ्या सारखा फालतु माणूस या जगात नसेल’ या म्हणत त्यांनी भास्कर जाधवांवर जहरी टीका केली आहे,
काय आहे निलेश राणे यांचे ट्विट
भास्कर जाधवने मान्य केले तो कुत्रा आहे… pic.twitter.com/F36IH6mEwk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 28, 2023