Bhaskar Jadhav । देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी कसून तयारी करत मैदानात उतरले आहेत. येत्या काही दिवसात देशात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच महाराष्ट्रातील वातावरणही आता तापलंय. कोकणातही निवडणुकीचं वातावरण असून राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजपाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर नुकतीच कडाडून टीका केली होती.
कार्यकर्त्यांना भावनिक साद Bhaskar Jadhav ।
भास्कर जाधव यांच्यावर भाजपने केलेली टीका त्यांना चांगलीच मनाला लागली असल्याचे दिसतंय. कारण भास्कर जाधव यांनी यावरून त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहीलं आहे. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे.
माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं Bhaskar Jadhav ।
कार्यकर्त्यांना पत्र लिहिताना भास्कर जाधव यांनी, “तुम्ही सर्वांनी मला साथ दिली आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रुपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळं मी यशाची अनेक शिखर पार करु शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्ष सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय.”असे म्हटले.
तसेच ‘ माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे’ असे त्यांनी पत्रात म्हटलंय. मनातील बोलण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना 10 मार्च रोजी एकत्र येण्याचंही आवाहन केलंय.
हेही वाचा
“अजित पवारांच्या निर्णयाला फडणवीस स्थगिती देतात” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं
Bhaskar Jadhav | भाजपच्या नेत्यांनी अद्याप फडणवीस-शिंदेंना पेढे का भरवले नाहीत – भास्कर जाधव