मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचं 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील त्यांनी केलेल्या 10 मोठ्या घोषणा पाहूया…
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महिला, शाळकरी मुली आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहे. तसेच काही विकास प्रकल्पांचीही घोषणा करण्यात आली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा –
1) महिलांच्या नावावर घर झाल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत, शाळकरी मुलींना बसने मोफत प्रवास.
2) 3 लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने.
3) मद्यावरील व्हॅटमध्ये 60 वरून 65 टक्के वाढ.
4) परभणी, अमरावती, सिंधुदूर्ग, उस्मानाबादमध्ये मेडिकल काॅलेज उभारणार.
5) पुण्यात रिंग रोडची घोषणा, 24 हजार कोटींचा निधी.
6) आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटींचा प्रकल्प.
7) पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, मुंबईतली कोस्टल मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करणार.
8) राज्यातील प्राचीन मंदिरांचे 8 प्राचीन मंदिरांचे जतन करणार, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या खर्चासाठी यंदा 400 कोटी.
9)सारथी, बार्टी संस्थांना प्रत्येकी 150 कोटी रूपयांची तरतूद.
10) पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देणार.