नवी दिल्ली – करोनाच्या भीतीमुळे आता भारतीय खेळाडूंवरदेखील संकट ओढवले आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर नेहमीप्रमाणेच सुरू राहणार असून त्यांना कोणालाही भेटता येणार नाही.
टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंनाच नव्हे तर प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व प्रशिक्षकांना शिबिराबाहेर कोणाचीही भेट घेता येणार नाही. तसेच त्यांना कोणालाही भेटू दिले जाणार नाही. क्रीडा मंत्रालयानेच हे जाहीर केले आहे.
भारतीय सहभागी होणारच……
करोनाच्या प्रभावामुळे ऑलिम्पिक स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, जर स्पर्धा झाली तर भारतीय खेळाडू त्यात सहभाग निश्चित घेतील असा ठाम विश्वास भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.