कराची – पाकिस्तानमध्ये उष्णतेची लाट पसरली असताना सिंध प्रांताच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे सर्वसामान्यांचे जिणे अतिशय अवघड बनले आहे. या भारनियमनामुळे सामान्यांचे दैनंदिन व्यवहार देखील प्रभावित झाले आहेत.
कराचीतील काही भागांमध्ये सामान्यांना वीजेचे वाढीव दराचे बिल भरणे शक्य नाही. या भागातील रहिवाशांना दररोज किमान ८ तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागते आहे.
कराचीतील भारनियमनाची स्थिती फारशी सुधारलेली नाही. तरी देखील स्थानिकांना वाढीव दराने वीज बिल भरावी लागत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
भारनियमनामुळे फ्रिज, फ्रिजर आणि अगदी यूपीएस देखील बंद पडू लागले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही उपकरणे बाद होऊ लागली आहेत. कचरा गोळा करणे आणि कचऱ्याच्या पुनर्वापरासारख्या कामात सरकार काटकसर करत असल्यामुळे लोक आजारी पडण्याची भीती आहे.
वाढीव दराने वीजबिल भरणा केला, तरी वीज जोडणी तोडण्याची धमकी दिली जाते, असे मुहम्मद ओवेस यांनी सांगितले.
मध्यमवर्गीय व्यक्ती एकतर त्याची बिले भरू शकते, त्याच्या मुलांना शिक्षण देऊ शकते किंवा त्यांच्या वैद्यकीय बिलांसाठी पैसे देऊ शकते.
वीज पुरवठा कंपनीची मक्तेदारी संपवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे. अन्य खासगी कंपन्यांनी वीज पुरवठ्यात सहभाग घेतला, तर या क्षेत्रात थोडी तरी स्पर्धा निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.
केई कंपनीकडून ६,५०० चौरस किलोमीटरपर्यंत सर्व, रहिवासी, उद्योग, व्यवसायिक आणि कृषी क्षेत्राला वीज पुरवठा केला जातो. कराचीच्या परिसरातील ३४ लाख ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.
वीज वितरण करणारी या भागात एकच कंपनी आहे. अन्य कंपनीला परवानगी दिली गेलेली नाही. उष्णतेची लाट असेपर्यंत भारनियमन केले जाणार नाही, अशी सरकारची ग्वाही आहे. मात्र प्रत्यक्षात ८ तासांचे भारनियमन आहे.