नवी दिल्ली – नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केल्यावर आता भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्यावर चौफेर हल्ला सुरू झाला आहे. नितीश यांची ही कृती संधीसाधूपणा असून 2020 च्या विधानसभेच्या वेळीच भाजपच्या अनेक लोकांना असे वाटत होते की नितीश आपल्यावरचे एक ओझे आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार आर. के. सिंह यांनी दिली आहे.
ते म्हणाले की त्यावेळीच अनेक जणांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.
नितीश यांच्या विरोधात नाराजी होती व त्याचा पक्षाला फटका बसेल अशी बिहारमधील अनेक नेत्यांची भावना होती. हा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांमध्ये माझाही सहभाग होता. मात्र भाजप नेतृत्वाने वेगळा निर्णय घेतला. मात्र आमचे म्हणणे खरे ठरले. कधीकाळी 115 जागा जिंकणारा नितीश यांचा पक्ष केवळ 40 जागांवरच अडकला. नितीश यांचे एकूणच राजकारणा आया राम गया राम झाले आहे. भारतीय जनता पार्टी एक लोकशाहीवादी पक्ष असून आमच्या पक्षात सगळ्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.