मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) कोणत्याही परिस्थितीत खेळविण्यासाठी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याच्या हालचाली करत आहे. 29 मार्चपासून आयपीएल सुरु होणार होती. मात्र, त्यात बदल करुन ही स्पर्धा 15 एप्रिलपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. सध्याची परिस्थिती पाहता ही स्पर्धा या नव्या तारखेपासून सुरु होण्याची शक्यता मावळली आहे. त्यातच केंद्र सरकारने परदेशी व्यक्तींचे व्हिसा याच तारखेपर्यंत रद्द केले असल्याने यंदाच्या स्पर्धेत केवळ भारतीय खेळाडूच सहभागी होऊ शकतील.
त्याचमुळे ही स्पर्धा पुढे ढकलून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये घेण्याचे प्रयत्न मंडळाने सुरु केले आहेत. आयपीएल रद्दच झाली तर केवळ संघ मालकांचेच नव्हे तर खेळाडूंचे तसेच मंडळाचेही प्रचंड नुकसान होणार आहे. जवळपास 5 हजार कोटींचे नुकसान सहन करण्याऐवजी ही स्पर्धा आशिया चषक स्पर्धा रद्द करुन आयोजित करण्याच्या मंडळाच्या हालचाली सुरु आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत मंडळ या मुद्द्यावर चर्चेला करणार आहे.