मुंबई – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर केला. गेल्या काही महिन्यांपासून कोश्यारी हे आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. अखेर राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता कोश्यारी यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ‘उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली’ अशा कडक शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले आहे.
कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये मिटकरी म्हणतात,”उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली.. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे”
उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली.. महाविकास आघाडी च्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 12, 2023
“वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या सन्मानपूर्वक रवानगी नंतर (कुठलाही पश्चाताप व्यक्त न करता) महाराष्ट्राला रमेश बैस यांच्या रूपाने नवीन राज्यपाल मिळाले आहेत .अपेक्षा करतो भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून राज्यपाल राज्यपालांसारखेच वागतील. भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत” अशी आशा देखील मिटकरींनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.
वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या सन्मानपूर्वक रवानगी नंतर (कुठलाही पश्चाताप व्यक्त न करता) महाराष्ट्राला रमेश बैस यांच्या रूपाने नवीन राज्यपाल मिळाले आहेत .अपेक्षा करतो भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून राज्यपाल राज्यपालांसारखेच वागतील. भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत. pic.twitter.com/K9eGPyosQx
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 12, 2023
शरद पवारांनी देखील भावना व्यक्त केल्या
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राची सुटका झाली आहे’. असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.