शरद पवार – छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते, असे वक्तव्य राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा महापुरुषांच्या इतिहासाची चर्चा सुरु झाली. प्रत्येक पुढारी माध्यमांसमोर बोलताना आपल्या परीने इतिहास मांडू लागला आहे.
संजय आठवतोय का? उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं…
अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी भाजपाला आक्रमक होण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनेदेखील कारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्द्दल मोठी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर अजित पवार हे लवकरच माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडतील, असे सुचक वक्तव्य पवार यांनी केले.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की ,”छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा. मला काळजी अशी वाटते की, मी ठाण्याला जेव्हा जातो तो धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो.”
“छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांनी उभारलेल्या स्वराज्यावर चहूबाजूंनी आक्रमणे होण्यास सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीतही छत्रपती संभाजी महाराज यांनी या स्वराज्याच भक्कमपणे रक्षण केले. याची नोंद सर्वांनी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा गोष्टीवर वाद घालण्याचे काहीही कारण नाही.” यावेळी शरद पवार यांना जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता मी त्यांनी केलेलं वक्तव्य ऐकलं नाही, असे ते म्हणाले.