मुंबई – भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिकेची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक असेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल(टाॅस) हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आहे. श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sri Lanka win the toss and opt to bowl first 🏏#INDvSL | Scorecard: https://t.co/fYd8oHsjcI pic.twitter.com/b1ulCEiVK0
— ICC (@ICC) January 3, 2023
दरम्यान, श्रीलंका संघ कादगावर कमकुवत दिसत असला तरीही याच संघाने यंदाची आशिया करंडक स्पर्धा जिंकलेली होती. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ भारतीय संघाला होणार असला तरीही टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकते त्यामुळे ही मालिका रंगतदार ठरेल यात शंका नाही.