Nana Patekar On Join Politics : नाशिकमध्ये शेतकरी साहित्य संमेलन सुरु आहे. यावेळी नाना पाटेकरांनी येथील कार्यक्रमाला हजेरी लावली.कुठलं सरकार करायचं हे ठरवा असं नाना यावेळी उद्देशून शेतकऱ्यांना म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी राजकारणात जाण्याबाबत देखील भाष्य केले. । Nana Patekar On Join Politics
देशभरात एकीकडे सर्वच पक्ष लोकसभेच्या तयारीला लागलेले आहेत. तर दुसरीकडे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. अशात अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्याला एक आवाहन केले आहे. ‘सरकारकडे मागू नका, तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा’ असं नाना शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले आहेत.तसेच “आम्ही कशाच्या आशेवर जगायचं ? रोज आम्हाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याची तुम्हाला किंमत नसेल तर मग आम्ही तुमची किंमत का करायची” असा सवाल देखील यावेळी नानांनी उपस्थित केला.। Nana Patekar On Join Politics
मला राजकारणात जाता येत नाहीये. कारण माझ्या पोटात जे आहे ते ओठांवर येतं. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मला त्या पक्षातून काढून टाकतील. असं करून महिनाभरात सगळेत पक्ष संपतील असंही नाना यावेळी म्हणाले. तसेच शेतकरी बांधवांसमोर आम्ही मोकळेपणे बोलू शकतो असंही नानांनी यावेळी मनमोकळे पणाने सांगितले. | Nana Patekar On Join Politics
यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या संख्येवर उद्देशून देखील महत्वाची टिपण्णी केली. ते म्हणाले,”आधी आम्ही (शेतकरी) ८० ते ९० टक्के होतो आता आम्ही ५० ते ६० टक्क्यांवर आलो आहोत. त्यामुळे तुम्ही सरकारकडे काही मागू नका.. आता कुठलं सरकार आणायचं याचा निर्णय घ्या. | Nana Patekar On Join Politics