Devendra Fadnavis । या देशात ‘गरीबी हटाव’चे नारे दिले जात असे पण गरीबी हटली नाही. पण मोदींनी करून दाखवले. पहिल्यांदा देशात गरीबां करीता योजना तयार झाल्या आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ देखील त्यांना मिळाला. जगातील 5वी अर्थव्यवस्था मोदींनी केली.
गरीबांच्या कल्याणातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते हे मोदींनी करून दाखवले, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर त्यांनी कॉंग्रेस काळातील धोरणांवर हल्लाबोल केला. ते जळगावात बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगाव दौऱ्यावर होते. तत्पूर्वी फडणवीसांनी व्यासपिठावरून मोदी सरकारच्या कामकाजावर भाष्य केले. फडणवीस पुढे म्हणाले की, आज आनंदाची गोष्ट आहे. या खान्देशाच्या तरुणाईला साद घालण्यासाठी व दिशा दाखविण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा आले आहेत.
विकसीत भारताचे जे स्वप्न मोदींनी दाखवले आहे, त्यात अग्रेसर येण्याचे काम ही जळगावची नगरी करत आहे. काळापैसा बाहेर काढून गरीबांच्या कल्याणासाठी त्याचा वापर केला. विकसीत भारताच्या संधी मिळतात. पंख तयार करण्याचे काम मोदीजींनी केले आहे. पुढच्या ४ वर्षांमध्ये जगातील तिसरी अर्थव्यवस्था ही भारताची आहे.
गरीबीचे निर्मूलन होतच आहे. पण त्याचबरोबर गरीबांच्या व युवकांसाठी रोजगाराच्या संधी तयार केल्या आहेत. तर यापुढे देखील अर्थव्यवस्था व रोजगाराच्या संधी येणार आहेत. वंदे भारत ट्रेन या देशात तयार झाली.
विदेशामध्ये ज्या पद्धतीने ट्रेन आहे अगदी तशीच व त्याहूनही प्रगत रेल्वे भारतात उपलब्ध करून दिली. विमानतळाप्रमाणेच देशातील रेल्वेस्थानक केली जात आहेत. एव्हाना तशी निर्माण देखील झाली आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
१०० देशही नरेंद्र मोदींचे आभार मानतात । Devendra Fadnavis । Narendra Modi
नरेंद्र मोदी यांनी आपली जागतिक नेतृत्व निर्माण केले. जगातील १०० देशांना मोदींनी कोविड लस दिली. ते देश देखील मोदींचे आभार मानत आहेत. मला विश्वास आहे. बिघडलेली घडी व्यवस्थित केली आहे. गेली दहा वर्षे तयारी झाली आहे.
तर पुढचे पाच वर्षे विकासाची गाडी वेगाने धावणार आहे. पुढचे पाच वर्षे मोदींनी निवडून द्यायचे आहे. भारताला सर्वोच्च शिखराला नेण्यासाठी मोदींना मत द्यायचे नाही तर देशासाठी हे मत असेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. । Devendra Fadnavis । Narendra Modi