नगर – संघटित गुन्हेगारी करून नागरिकांना धमकाविण्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असणार्या राहुरी फॅक्टरी येथील चार जणांच्या टोळीविरुद्ध पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दीड वर्षांकरिता हद्दपारीची कारवाई केली.
टोळीप्रमुख मनोज गोरक्षनाथ डोंगरे, स्वप्निल रमेश बोरूडे, आबासाहेब बाळासाहेब वरखेडे, आदेश उर्फ आदिनाथ रवींद्र जाधव (सर्व रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) असे त्यांची नावे आहेत. संघटितपणे टोळी तयार करून घातकशस्त्रे, पिस्तुल, तलवार, लाकडी दांडके अशी हत्यारे बाळगून लोकांना धमकाविणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी, बळजबरीने चोरी आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी 27 जुलै 2020 रोजी दोन वर्षांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला काल मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, वरील हद्दपार व्यक्तींविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. यापुढेही संघटित गुन्हेगारी करणार्या टोळ्यांची माहिती संकलित करून हद्दपारीसारखी कारवाईचे संकेत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले.