नगर – राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅड. राजाराम आढाव तसेच त्यांच्या पत्नी अॅड. मनीषा यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधण्यासाठी एक विशेष पथक या नेमावे तसेच ज्येष्ठ विधी तज्ञ सरकारी वकील म्हणून अँड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जन आधार संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या बाबात निवासी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहर अध्यक्ष शहानवाज शेख, युवक शहर अध्यक्ष शहबाज शेख, अक्षय पठारे, ईशान शेख, सचिन फल्ले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी देखील अनेक वकीलांवर अनेक विकृत आरोपींनी कडून हल्ले झाले आहेत. त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना चाप बसण्यासाठी तसेच समाजाला न्याय देणाऱ्या वकील बांधवांच संरक्षण करण्यासाठी वकिलांसंदर्भात तयार केलेल्या वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणी यावेळी करण्यात आली.