मुंबई – मुंबईसह (Mumbai) उपनगरातील गणेशोत्सव (Ganesh Festival) म्हणजे गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच. दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात गणेशोत्स (Ganesh Festival) साजरा केल्या जातो. यंदा तब्बल 3 हजार 700 गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले होते.
यापैकी 3 हजार 100 मंडळांनी अटींचे पालन केल्याचे दिसून आल्याने त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरीत 500 मंडळाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
मुंबईतील गणेशोत्सव (Ganesh Festival) म्हणजे नवचैतन्याची नुसती उधळण. सर्वत्र जल्लोष आणि उत्साह दिसून येतो. करोना काळात या गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले होते.
मात्र, आता सर्वच सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे केले जात असून, यंदाचा गणेशोत्सव त्यापैकीच एक आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात गणरायांच्या आगमनाची लगबग सुरू असून, त्यामध्ये काही गणेश मंडळे अजूनही परनागीसाठी रांगेत असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा 1 ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आली होती.
रविवारपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील तब्बल 3 हजार 100 मंडळांना पालिकेकडून परवानगी मंजूर करण्यात आली आहे. तर अद्यापही काही मंडळे परवानगीच्या प्रक्रियेमध्ये असून, सोमवारपर्यंत त्यांच्या परवानग्या अंतिम होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.