नवी दिल्ली – विराट कोहलीने त्याच्या संपूर्ण 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीपेक्षा एका आयपीएल हंगामात सर्वाधिक चुका केल्या आहेत, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.
अडीच वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय शतक न झळकावलेल्या कोहलीने 16 आयपीएल सामन्यांमध्ये 22.73 पेक्षा कमी सरासरीने 341 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग म्हणाला, आम्हाला माहीत असलेला हा विराट कोहली नाही. या मोसमात खेळणारा विराट हा वेगळाच होता. अन्यथा या मोसमात त्याने जितक्या चुका केल्या आहेत, त्या त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने केल्या नाहीत. तसेच जेव्हा तुम्ही धावा करत नाही, तेव्हाच अशा चुका होत असतात. यामुळे आता विराटला या बॅडपॅचमधून बाहेर पडण्यासाठी विविध पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल, असेही सेहवाने सांगितले.