नवी दिल्ली/मुंबई – मान्सूनने 21 जून 1961 नंतर प्रथमच दिल्ली आणि मुंबई या दोन्ही भागांना एकत्र कव्हर केले आहे असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सुन नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी दिल्लीत पोहोचला,
पण मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत त्याचा प्रवेश दोन आठवडे उशीरा झाला. 21 जून 1961 नंतर पहिल्यांदाच मान्सून दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी दाखल झाला असे हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डीएस पै यांनी सांगितले.
दिल्लीत आज मान्सुनची धुव्वाधार एन्ट्री झाली. आयएमडीच्या आकडेवारीनुसार धनसा हवामान केंद्रात सुमारे 80 मिमी, जाफरपूर आणि लोदी रोडमध्ये प्रत्येकी 60 मिमी, अयानगर आणि मुंगेशपूरमध्ये प्रत्येकी 50 मिमी आणि एसपीएस मयूर विहारमध्ये 40 मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.
हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे मान्सूनची सध्याची हालचाल ‘जोमदार’ असल्याचे हवामान खात्याने सांगितले. जर नोंदलेला पाऊस सरासरीपेक्षा चारपट जास्त असेल किंवा तो बऱ्यापैकी व्यापक असेल तर मान्सूनची क्रिया ‘जोमदार’ मानली जाते.
मान्सूनची उत्तरेकडील रेषा आता वेरावळ, बडोदा, उदयपूर, नारनौल, अंबाला आणि कटरा या भागातून गेली आहे.दोन दिवसांत गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या उर्वरित भागांमध्ये मान्सूनच्या आणखी काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.