नगर -देशातील 130 कोटी भारतीयांचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ उज्वल करण्याची क्षमता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यातच आहे. त्यांच्या अनेक धाडसी निर्णयांमुळे भारताची मान जगात उंचावली असल्यचे विचार भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी व्यक्त केले.
मोंदी सरकारला दोन वर्षे पुर्ण झाल्याबद्दल नगर शहर भाजपतर्फे मोदी सरकार द्वितीय वर्षपूर्ती संपर्क अभियान’ सुरु करण्यात आले आहे. त्या अभियनाचा येथील शनि चौकात प्रारंभ करताना ते बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे, सुनील रामदासी, उपमहापौर मालन ढोणे, अजय चितळे, नरेंद्र कुलकर्णी, सभापती लता शेळके, सचिन पारखी, किशोर बोरा, ऍड. विवेक नाईक, अमित गटणे यांच्यासह शहर भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
गंधे म्हणाले, “”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत भारताला विकासाच्या शिखरावर नेले. त्यामुळेच भारतातील जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत मागच्या वर्षी पुन:श्च पंतप्रधान पदाचा बहुमान मोदी यांना मिळवून दिला. सहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने काश्मिर ते कन्याकुमारी व मुंबई ते कलकत्ता अशी सर्व देशभर विकासकामे केली.” ज्येष्ठ नेते रामदासी म्हणाले, “”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांच्या कारकर्दीत देशात केलेले कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने विशेष संपर्क अभियान सुरु केले आहे.