नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील जनतेला काय हवे आहे हे समजत नाही कारण त्यांना त्यांच्या मित्रांच्या आवाजाशिवाय काहीही ऐकू येत नाही, असा आरोप कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. लोकांच्या कल्याणासाठी म्हणून केंद्र सरकारने ज्या ज्या योजना आणल्या त्यात लोकांचेच नुकसान होत असल्याने लोकांनी या योजना नाकारल्या.
तरूणांनी अग्निपथ योजना नाकारली, शेतकऱ्यांनी शेतीचे नवीन कायदे नाकारले, अर्थतज्ज्ञांनी नोटबंदी नाकारली, व्यापाऱ्यांनी जीएसटी नाकारली अशी उदाहरणेही त्यांनी दिली. पण पंतप्रधानांना देशातील लोकांना काय हवे आहे हे समजत नाही कारण मोदींना त्यांच्या मित्रांच्या आवाजाखेरीज त्यांना काहीही ऐकू येत नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.