लाखणगाव -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर, लाखणगाव, पोंदेवाडी, लोणी, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, रानमळा येथील शेतकऱ्यांनी पावसाळी बाजरी काढणीची कामे सुरू केली आहेत.
करोनामुळे बाहेरील मजूर रोजगारासाठी मिळत नसल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. 350 रुपये मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
करोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात तरकारी पिकांना बाजारभाव नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीचे पीक घेतले होते.यंदा बाजरीचे पीक चांगले आले असून, उत्पादन वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.