मुंबई : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राकीय वातावरं पूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यातच भाजपचे नेते निलेश राणे यांनी याच प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना मागील दोन वर्षे कुणालाच मुख्यमंत्री दिसले नाहीत. आता मेव्हणा पकडला गेला म्हणून तडफड आहे. इकडे मेव्हणा पकडला गेला आणि मुख्यमंत्री बाहेर आले, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच बैठका आणि अधिवेशनातही उपस्थित नव्हते. मात्र सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते उपस्थित झाले आहेत. काल त्यांनी सभागृहात भाषणदेखील केले. या भाषणाचीही निलेश राणे यांनी चांगलीच खिल्ली उडवली.
“मुख्यमंत्र्यांचे भाषण हे अत्यंत रटाळ आणि कुजलेलं होतं”, अशी टीका त्यांनी केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा उद्या दापोली येथे दौरा आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमय्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काल भाषण केलं. त्यावरूनही निलेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ‘ विधानसभेतील मुख्यमंत्र्याचे भाषण नव्हते ते सेना भवनातलं भाषण होतं. बाबासाहेबांच्या भाषणाची क्वालीटी मुख्यमंत्र्यामध्ये नाही. टोमणे मारणे म्हणजे मुख्यमंत्र्याचे भाषण नसते. मुख्यमंत्र्याचे भाषण म्हणजे रटाळ कुजलेलं भाषण होतं. विरोधीपक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली. त्यात ते निरुत्तर झालेत. मुख्यमंत्र्यांनी लोकं टिंगल उडवायला लागलेत. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासारखे बोलत नाही. ते दादरमध्ये असल्यासारखे बोलतात, अशी टीका त्यांनी केली.