पुणे – रयतेच्या सुखासाठी शिवाजी महाराजांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. अशा पराक्रमी आणि बेधडकपणे लढणाऱ्या शिवाजी महाराजांची आज 360 वी जयंती साजरी होत आहे.
दरम्यान, याच पार्शवभूमीवर शहरातील शिवजयंती उत्सव समीतीच्या वतीनी लाल महाल ते एसएसपीएम येथिल शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.