Manoj Jarange Patil| लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीत बैठक बोलवण्यात आली होती.
या बैठकीनंतर जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट करत मोठी घोषणा केली आहे. “लोकसभेला एका मतदारसंघात शेकडो मराठा उमेदवार उभे केल्यास मत फुटतील. त्यापेक्षा जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार द्या आणि त्याच्या मागे संपूर्ण ताकद उभी करा, कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा निर्णय तुम्ही घ्या. ते मी सांगणार नाही,” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
“आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीला गेले. पण त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. आपला प्रश्न दिल्लीतला नाही. तो राज्यातला आहे. मराठा समाजानं कोणत्याही सभेला जाऊ नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करायचा नाही. पण मतदान १०० टक्के करा. त्यामुळे एकमतानं प्रत्येक जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार उभा करू. यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्या. तुम्ही ज्याला उमेदवारी देऊ इच्छिता, तो सगळ्यांना मान्य आहे का, याबद्दल चर्चा करा. त्याची माहिती मला लेखी माहिती द्या. त्यानंतर आपण उमेदवारांची घोषणा करू,” अशी योजना असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जरांगे यांनी पुन्हा एकदा राजकारण हा माझा मार्ग नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात मी उतरणार नाही, असेस्पष्ट केले.
हेही वाचा: