नवी दिल्ली – मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मणिपूरचे डीजीपी पी. डुंगेल यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. आता 1993 बॅचचे आयपीएस अधिकारी राजीव सिंग हे नवे पोलिस प्रमुख असतील. तर पी. डुंगेल यांची ओएसडी (गृह) नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या दिशेने आम्ही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल. यासोबतच शांतता समितीचीही स्थापना करण्यात येत आहे.
मी मणिपूरच्या जनतेला आश्वासन देतो की कोणताही पक्षपात आणि भेदभाव न करता तपास केला जाईल आणि दोषींना शिक्षा होईल. मी मणिपूरच्या सर्व जनतेला आवाहन करतो, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि राज्यात शांतता राखा.