Tehreek-e-Hurriyat : केंद्रातील मोदी सरकारची मोठी कारवाई करत काश्मिरी फुटीरतावादी पक्ष ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे. याविषयीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ” फुटीरतावादी पक्ष तहरीक-ए-हुर्रियत (TeH) ला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यानुसार (UAPA) ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे. केंद्र सरकार काश्मिरी फुटीरतावादी संघटनांवर सातत्याने कारवाई करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ विरोधात कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी खोऱ्यातील आणखी एका संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. 27 डिसेंबर रोजी सरकारने मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) ला प्रतिबंधित दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. या संघटनेचा नेता मसरत आलम भट हा भारतविरोधी अजेंडा चालवायचा. पाकिस्तानच्या समर्थनार्थ तो खोऱ्यात कारवायाही करत होता.
याविषयी बोलताना अमित शाह म्हणाले की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे आणि जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करणे हा त्याचा उद्देश आहे. ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ही काश्मीरमध्ये फुटीरतावादाला प्रोत्साहन देत होती. ही संघटना इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता. दहशतवादाबाबत आमच्या सरकारचे शून्य सहनशीलतेचे धोरण असल्याचे गृहमंत्री म्हणाले. भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांचा तात्काळ उच्चाटन करण्यात येईल.
The ‘Tehreek-e-Hurriyat, J&K (TeH) has been declared an ‘Unlawful Association’ under UAPA.
The outfit is involved in forbidden activities to separate J&K from India and establish Islamic rule. The group is found spreading anti-India propaganda and continuing terror activities to…— Amit Shah (@AmitShah) December 31, 2023
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर “तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीर (TeH) ला UAPA अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे,” लिहिले आहे. जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करून इस्लामिक शासन स्थापन करण्याच्या कार्यात ही संघटना सहभागी होती. ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देण्यासाठी भारतविरोधी प्रचार करत असून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती.
अमित शाह पुढे म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत कोणतीही व्यक्ती किंवा संघटना भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली असेल तर ती तत्काळ उधळून लावली जाईल.’ खोऱ्यातून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी मोदी सरकारने फुटीरतावादी संघटनांवर सातत्याने कारवाई केली आहे. त्या दिशेने टाकलेले हे सर्वात अलीकडचे पाऊल आहे.