मुंबई – विवाहित मुलीचा पतीसोबत घटस्फोट झाला कि नेमकं काय होत ? समाजाचा अशा व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो. घटस्फोटासारख्या कठीण परिस्थितीतून ती व्यक्ती गेल्यानंतर तिच्या मनाची काय अवस्था होते या सर्व गोष्टींचा उलगडा करणाऱ्या एका नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असं या मालिकेचं नाव असून सध्या या मालिकेची टेलिव्हिजन विश्वात चांगलीच चर्चा आहे.
रंग माझा वेगळा.. आई कुठे काय करते अशा वेगळ्या आशयाच्या सिरीयल प्रेक्षकांसमोर घेऊन येणारी वाहिनी स्टार प्रवाहवर ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. त्याबाबतचा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.
काय आहे प्रोमोमध्ये नेमकं
या प्रोमोमध्ये जेवणाच्या टेबलवर एक कुटुंब जेवताना दिसत आहे. सर्वांना जेवण वाढण्यासाठी एक तरुणी देखील उभी असल्याचे यावेळी पाहायला मिळते. टेबलावरील तरुण त्या मुलीने वरण गोड केलं म्हणून तिला बोलायला सुरुवात करतो. असले उद्योग स्वतःच्या घरी करायचे.. म्हणूनच नवऱ्याने टाकलय हिला असं असं म्हणत तो तरुण थेट तिच्या घटस्फोटावर भाष्य करतो. तर दुसरीकडे तिची आई देखील तिला ‘तू हा विचार नवऱ्याला सोडण्यापूर्वी करायला हवा होता कि लोक काय म्हणतील’ असं सुनावते.
View this post on Instagram
‘मुलगी झाली हो’ मालिका फेम अभिनेत्री दिव्या पुगावकर ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये दिव्या आनंदीची भूमिका साकारणार आहे. येत्या ८ मे पासून ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे.