मुंबई: जगात कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्रात मात्र कोरोनासोबत राजकारण तापलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत पेच निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही निवडणूक होणं शक्य नसल्याचं सांगत महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना राज्यपालांच्या कोट्यातून आमदार करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र आता राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे संधी साधत मुख्यमंत्र्यांवर तिखट शब्दात टीका करीत आहेत. “बेस्ट मुख्यमंत्र्याला आमदार करा रे कोणी तरी…. रोज भिकऱ्यासारखे वेग वेगळ्या मार्गाने भीक मागतायत”.असे ट्विट राणे यांनी केले आहे.
यापूर्वी देखील ‘मुख्यमंत्री पद काँग्रेसमुळे, आमदारकी राज्यपालाकडून, पक्ष वडलांचा… ह्या माणसाचं स्वतःच काहीच नाही’ अशी टीका निलेश राणे यांनी केली होती.
बेस्ट मुख्यमंत्र्याला आमदार करा रे कोणी तरी…. रोज भिकऱ्यासारखे वेग वेगळ्या मार्गाने भीक मागतायत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 29, 2020