लातूर – बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलवून लावण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला असून… त्यासाठी तुम्ही सर्वांनी तिथे येणे अत्यंत गरजेचं आहे… कारण ते तुमचं कर्तव्य आहे. असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
राजमुद्रित ध्वजाखाली पक्षाचा पहिला भव्य उपक्रम… तोही शेतकऱ्यांसाठीचा!
मनसे अध्यक्ष @RajThackeray ह्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाला उपस्थित राहून महाराष्ट्र सैनिकांना शुभेच्छा दिल्या.#शेतकऱ्यांचीमनसे? pic.twitter.com/Fh1sUVuW39
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 1, 2020
काल (दि. १) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लातूर येथे कृषी प्रदर्शनाचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राज म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे लातूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष @RajThackeray भेट देणार आहेत. ह्याप्रसंगी ३५६ तालुक्यात सुरु होणाऱ्या शेतीच्या दवाखान्याचं लोकार्पण होणार आणि १००० वनराई बंधारे बांधण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सज्ज होणार. #शेतकऱ्यांचीमनसे? pic.twitter.com/jhD8Uh15qG
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 30, 2020
पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईतल्या आझाद मैदानावर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
‘पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना ह्या देशातून हाकललंच पाहिजे’ ही भूमिका @RajThackeray ह्यांनी महाअधिवेशनात मांडली, आणि ह्या बाबतीत सरकार जी कारवाई करेल त्याला पाठिंबा असेल अशी भूमिका त्यांनी मांडली. ह्याबाबतीत ‘मनसेचा युटर्न’ अशी मांडणी करणाऱ्या माध्यमांसाठी ही चित्रफीत. ? pic.twitter.com/QZ9BbMQeVG
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 28, 2020