पुणे : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर महाराष्ट्र आणि छत्तीसगड दरम्यान रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत सुरू झाली आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा महाराष्ट्राच्या बाजूनं लागला असून कर्णधार नौशाद शेखने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Maharashtra Won the Toss & elected to bat #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 25, 2019
महाराष्ट्राने फलंदाजीस सुरूवात केली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा महाराष्ट्राच्या २४ षटकांत ३ बाद ५८ अशी धावसंख्या झाली आहे. सध्या खेळपट्टीवर रूतूराज गायकवाड २१ आणि अंकित बावणे ०१ धावांवर खेळत आहेत.
तत्पूर्वी, महाराष्ट्राचा कर्णधार नौशाद १२ तर ट्रंकवाला १० धावांवर बाद झाले. त्यानंतर फलंदाजीस आलेला अनुभवी फलंदाज केदार जाधव मोठी खेळी करेल असं वाटत होत, पण त्याने निराशा केली. केदार जाधवला पुनीत दात्येने वीर प्रतापकरवी १२ धावांवर झेलबाद केलं.
WICKET! Over: 14.2 K M Jadhav 12(10) ct Veer Pratap Singh b Puneet Datey, Maharashtra 47/3 #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 25, 2019
दरम्यान, स्पर्धेतील सलग दोन पराभवांमुळे ‘क’ गटात अव्वल दोनमध्ये राहण्यासाठी महाराष्ट्राला पुढील प्रत्येक लढत जिंकणे आवश्यक आहे.