गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे वादग्रस्त विधान
मुंबई – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चा काढण्यात आला. याच पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नागरिकत्व कायदा योग्य असल्याचे सांगत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ विधान केली आहे.
Muslims have 150 countries to go, Hindus have only India. What is the problem if they want to come back? asks Gujarat CM Vijay Rupani
— Press Trust of India (@PTI_News) December 24, 2019
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी साबरमती आश्रमाबाहेर नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीत म्हटले की,’मुस्लिमांसाठी जगात 150 इस्लामिक देश आहेत. ते कोणताही निवडू शकतात पण हिंदुंसाठी फक्त भारतच एकमेव देश आहे, ते पुढे म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये फाळणीवेळी 22 टक्के हिंदू होते. आता छळ, बलात्कार, अत्याचार यामुळे ही लोकसंख्या कमी होऊन फक्त 3 टक्के इतकी राहिली आहे. यासाठी हिंदूंना भारतात परत यायचं आहे. आम्ही तेच काम करत आहे जे काँग्रेसने करायला हवं होतं. आता आम्ही करत आहे तर तुम्ही का विरोध करत आहात. बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या फक्त 2 टक्के इतकी असल्याचंही विजय रूपाणी म्हणाले.