पुणे : अंकित बावणेचे शानदार व्दिशतक तर ऋतुराज गायकवाड आणि नौशाद शेखच्या शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ओडिशाविरूध्द पहिला डाव ५ बाद ५४३ वर घोषित केला. यासह महाराष्ट्राने ओडिशावर पहिल्या डावानंतर २५० धावांची आघाडी घेतली आहे.
End Innings: Maharashtra – 543/5 dec in 149.5 overs (R A Tripathi 65 off 48, A R Bawane 204 off 406) #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 6, 2020
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. ओडिशाने प्रथम फलंदाजी करताना राजेश धुपेरच्या नाबाद ११०(१५२) आणि शंतनू मिश्राच्या ८४(२६७) धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद २९३ धावा केल्या. महाराष्ट्राकडून गोलंदाजीत आशय पालकरने सर्वाधिक ४, सत्यजित बच्छाव आणि मुकेश चौधरीने प्रत्येकी २ तर मनोज इंगळेने १ गडी बाद केला.
End Innings: Odisha – 293/10 in 101.1 overs (Pappu Roy 1 off 4, Rajesh Dhuper 110 off 152) #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 5, 2020
त्यानंतर महाराष्ट्राने प्रत्युत्तरात फलंदाजी करताना अंकित बावणेच्या नाबाद २०४(४०६), ऋतुराज गायकवाडच्या १२९(२१७), नौशाद शेखच्या १००(१५७) आणि आर. त्रिपाठीच्या ६५(४८) धावांच्या खेळीच्या जोरावर पहिला डाव तिस-या दिवशी ५ बाद ५४३ धावसंख्येवर घोषित केला. ओडिशाकडून पहिल्या डावात सूर्याकांत प्रधानने २ तर राजेश मोहंती, डी प्रधान आणि अभिषेक राऊतने प्रत्येकी १ गडी बाद केला.
Stumps Day 3: Odisha – 24/0 in 10.6 overs (Anurag Sarangi 10 off 31, Shantanu Mishra 14 off 35) #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 6, 2020
प्रत्युत्तरात ओडिशाने दुस-या डावात खेळताना तिस-या दिवसअखेर ११ षटकात बिनबाद २४ धावा केल्या असून ते अजूनही २२६ धावांनी पिछाडीवर आहेत. तिस-या दिवसाचा खेळ थांबला शंतनू मिश्रा १४(३५) तर अनुराग सांरगी १०(३१) धावांवर खेळत आहे.