मुंबई : राज्यात शिवभोजन योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. गरीब-गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण देणारी शासनाची महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी होत असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
126 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाख 48 हजार 820 लोकांनी घेतला लाभ असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान शिवभोजन योजनेची सुरतवात २६ जानेवारीला करण्यात आली होती.