Maharashtra Rain : यंदा पावसाने राज्यावर वक्रदृष्टी पडल्याची दिसत आहे. त्यामुळेच ऑगस्ट कोरडा गेला तर सध्या सुरु असणारा सप्टेंबर देखील कमी पावसाचा जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, असे असले तरी आज संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस (Rain) पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Department of Meteorology) वर्तवली आहे.
हवामान विभागाने (Department of Meteorology) आज राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. खास कसून मराठवाड्याच्या काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्यानं राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
येत्या चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. तर काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने (Department of Meteorology) दिला आहे. तर 17 आणि 18 तारखेला गुजरात राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भाच्या जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्यासोबतच नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धरणसमूहात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील पावसाच्या उर्वरित दोन (25 ते 30 सप्टेंबर आणि 9 ते 13 ऑक्टोबर) आवर्तनातून चांगला पाऊस अपेक्षित आहे.
राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील महिन्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडला होता. त्यानंतर चालू सप्टेंबर महिन्यात देखील पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळं पिकांना मोठा फटका बसला आहे.