Maharashtra Rain Update – राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस ( rain forecast ) पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, पुण्यातही आगामी तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने हुलकावणी दिल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, आता नव्या अंदाजामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याच्या प्रमावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
बहुतांश भागांत दाट ढग साचल्याचे उपग्रह छायाचित्रांत दिसत आहे. परिणामी, पाऊस कमबॅक करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. Maharashtra Rain Update
पुण्यासाठी यलो, ऑरेंज अलर्ट
दरम्यान, शहर परिसरात सोमवारी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे शहर परिसरात येत्या 48 तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. शहर परिसरासाठी 17 ऑगस्ट रोजी पावसाचा “यलो’, तर 18 ऑगस्ट रोजी “ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी 48 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट होते.
हवामान विभागानं औरंगाबाद, जालना, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. Maharashtra Rain Update
हवामान विभागाने काल वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसानं हजेरी लावली आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, बुलडाणा, जळगाव, अहमदगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला असून बुलडाणा,वाशिम, जालना, बीड, अहदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 18 ऑगस्टसाठी यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. Maharashtra Rain Update