मुंबई :- राज्याच्या राजकारणामध्ये परत एकदा परत एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिदें-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे.
अजित पवार यांच्यासोबत 30 ते 40 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेनंतर सेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली असल्याचं निश्चित झालं आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून १४ महिने तुरुंगात राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत एका वाक्यात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ट्विट केले की, “मी आणि आमचे सगळे सहकारी साहेबांसोबतच!” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच एक फोटोही पोस्ट केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी आज महायुती सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.