सातारा – तब्बल ६१ वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्र केसरीचा फड साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये मंगळवार ५ ते ९ एप्रिल या काळात रंगणार आहे. या तालमीमध्ये तब्बल ९०० मल्ल ४५ संघांमधून झुंजणार आहेत. गादी आणि माती विभागातील वजन ५७ ते १२५ किलोच्या गटांमध्ये विजेत्यांना ३३ लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.
उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील आजपासून (गुरुवार) सकाळच्या सत्रात होणा-या सर्व लढती रद्द करण्यात आल्या आहेत. हा निर्णय महाराष्ट्र कुस्ती परिषदेने कळविला आहे. गेल्या दाेन दिवसांपासून ही स्पर्धा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात घेण्यात येत आहे. उन्हाचा तडका वाढल्याने आजपासून (गुरुवार) सकाळच्या सत्रातील लढती रद्द करण्यात आल्या आहेत. संयाेजकांनी दिलेल्या माहितीनूसार आज सायंकाळी महाराष्ट्र केसरीसह अन्य वजन गटातील लढती हाेतील.