Maharashtra Corona Update – सध्या राज्यात दुसरी लाट आली आहे. प्रमुख महानगरांमधील रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. मात्र ही कोरोनाची साखळी येत्या 30 एप्रिलपर्यंत तोडता येऊ शकते, त्यासाठी राज्यात मिनी लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायला हवेत, असे मत करोनासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात गर्दीची ठिकाणे टाळण्याचे तसेच सार्वजनिक वाहतूक अर्थात बस आणि रेल्वे सेवांमध्ये देखील बदल करण्याची गरज आहे. राज्यात मृत्यूदर कमी झाला आहे. पण काही ठिकाणी मुत्यूदर वाढला आहे. सर्वांनी लस घेणे आणि एकूणच लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. लस घेतल्यानंतर करोना होणारच नाही अशा भ्रमात न राहता खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करण्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, करोना प्रतिबंधनात्मक लस आणि मुत्यूचा काहीही संबंध नाही. लस घेण्याआधी असलेल्या व्याधी डॉक्टरांना सांगाव्यात. डॉक्टरांच्या सल्यानुसार लस घ्यावी. ताप येणे, अंग दुखणे, हात दुखणे हे त्रास लस घेल्यानंतर होणार आहेत परंतू लस घेतल्याने कोणाचा मृत्यू झाला नाही, असेही स्पष्ट करत लसीबाबतची भीती घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.