कर्जवसुलीमुळे “एनपीए’त मोठी घट
मुंबई – बॅंक ऑफ महाराष्ट्रला पहिल्या तिमाहीत झालेल्या नफ्यात 24.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत बॅंकेला 101.02 कोटी रुपयांचा नफा झाला.
बॅंकेने केलेल्या परिणामकारक उपाययोजनांमुळे बॅंकेचे खराब कर्जाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे बॅंकेला यासाठी करावी लागणारी तरतूद कमी करावी लागली आहे. त्यामुळे बॅंकेच्या नफ्यात वाढ होत आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत बॅंकेला केवळ 81 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
बॅंकेला या तिमाहीमध्ये खराब कर्जापोटी केवळ 408 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी या कारणासाठी बॅंकेला 1,037 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती. बॅंकेने कर्जवसुली उत्तम प्रकारे केली आहे. त्यामुळे बॅंकेचे ढोबळ एनपीए या तिमाहीत 10.93 टक्के नोंदले गेले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेचे ढोबळ एनबीए 17.90 टक्के होते. मूल्यात ढोबळ एनपीए 10,558 कोटी रुपये झाले आहे. ते गेल्या वर्षी 1,6649 कोटी रुपये होते. पहिल्या तिमाहीत निव्वळ एनपीए 4.10 टक्के म्हणजे 3,677 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत निव्वळ एनपीए 5.98 टक्के म्हणजे 4,856 कोटी रुपये इतके होते. आज बॅंकेच्या शेअरच्या भावात 2.15 टक्क्यांची वाढ होऊन बॅंकेचा शेअर 11.87 रुपयांवर गेला आहे.