निवडणूक आयोगाने सांगितले की, जातीय संघर्षाने प्रभावित मणिपूरच्या खुरई मतदारसंघातील मोइरांगकाम्पू साझेब आणि थोंगम लीकाई, क्षेत्रीगावमधील चार, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजूमधील एक, उरीपोकमधील तीन आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कोंथौजम येथे एक मतदान अशी 11 मतदान केंद्रे ( Manipur polling stations ) आहेत.
या ठिकाणी ईव्हीएमची तोडफोड ( EVM destruction ) आणि गोळीबार, ( incidents of firing ) मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकार नोंदवले गेले. मणिपूरच्या अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूर या दोन लोकसभा जागांसाठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यात मतदान झाले आणि 72 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तत्पूर्वी, शुक्रवारी मणिपूरच्या लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या मतदानादरम्यान, काँग्रेसने निवडणुकीत हेराफेरी आणि बूथ कॅप्चरिंगचा आरोप केला होता आणि 47 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली होती. काँग्रेसचे मणिपूर युनिटचे अध्यक्ष के. मेघचंद्र म्हणाले की, पक्षाने मणिपूरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे आणि ‘इनर मणिपूर’ मतदारसंघातील 36 मतदान केंद्रांवर आणि ‘बाह्य मणिपूर’ मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे.