पिंपरी – वर्षभरापूर्वी धंदापाणी चांगला होता. कमाईही बऱ्यापैकी होती. मात्र करोना आला आणि आयुष्याची पुरती वाट लागली. लॉकडाऊन शिथील झाल्यावर धंद्याची गाडी पुन्हा हळुहळू पुन्हा रूळावर येऊ लागली होती. शहरातील करोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने आता पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन लागला तर जगणे कठीण होईल. अशा शब्दांत आपली भावना व्यवसायिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
दिवसभर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र लॉकडाऊन झाल्यावर कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा, रिक्षाचे हप्ते कोठून भरायचे, मुलांचे शिक्षण, घरभाडे कोठून द्यायचे, असे प्रश्न आम्हा रिक्षा चालकांसमोर निर्माण होणार आहे. नागरिक घराबाहेर पडत नाहीत. मागील लॉकडाऊनचे सात हप्ते थकले असून त्याचे मोठ्या प्रमाणात व्याज लावण्यात आले आहे. ओला-उबेर या सारख्या कंपन्या प्रवासी क्षेत्रात उतरल्याने आधीच धंद्यात मंदी आली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन
नको आहे.
– महादेव पवार, रिक्षा चालक
रेल्वे स्टेशनचा रस्ता पाहून फेरीवाल्याचा धंदा सुरू केला. आता रेल्वेच बंद असल्याने प्रवाशांचा राबता नाही. सकाळी दुकान लावल्यावर संध्याकाळी बोहनी होते. कधी-कधी तर बोहनीही होत नाही. अशा स्थितीत घर कसे चालवायचे असा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यातच पुन्हा लॉकडाऊन झाले तर काय होईल, या भितीनेच आमच्या पोटात गोळा येतो. सध्या सुरू असलेली रात्रीची संचारबंदीच ठीक आहे.
– हरेश कृपलानी, फेरीवाला
शहरात ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने ग्राहक हॉटेल सुरू ठेवूनही धुळीमुळे ग्राहक येत नाही. जेवणाची वेळ संध्याकाळची असल्याने आठनंतरच ग्राहक जेवण करण्यासाठी येतात. मात्र सरकारने हॉटेलसाठी आठची वेळ, त्यातही 50 टक्के ग्राहकांची अट, त्यामुळे हॉटेल व्यवसाय डबघाईला आला आहे. सध्या मिळणाऱ्या उत्पन्नातून कसेबसे घर चालते. जर पुन्हा लॉकडाऊन केले तर आम्हाला हा धंदा बंद करून दुसरा धंदा सुरू करावा लागेल. हॉटेल चालकांच्या बाबतीत घातलेले निर्बंध
शासनाने उठवावे.
– दत्ता जाधव , गॅरजे मालक
दिवसभर रिक्षा चालवून कुटूंबाचा उदहनिःर्वाह करतो. मात्र लॉकडाऊन झाल्यावर कुटूंबाचा खर्च कसा चालवायचा, रिक्षाचे हप्ते कोठून भरायचे, मुलांचे शिक्षण, घरभाडे कोठून द्यायचे, असा प्रश्न आम्हा रिक्षा चालकांसमोर निर्माण होणार आहे. नागरिक घराबाहेर पडत नाहीत. मागील लॉकडाऊनचे सात हप्ते थकले असून त्याचे मोठ्या प्रमाणात व्याज लावण्यात आले आहे. ओला-उबेर या सारख्या कंपन्या प्रवासी क्षेत्रात उतरल्याने आधीच धंद्यात मंदी आली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन
नको आहे.
– अनिल लालवानी, हॉटेल व्यावसायिक
आम्ही पूर्वीपासूनच भाजीचा व्यवसाय करीत आहोत. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांनीही भाजीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. जर सरकार लॉकडाऊन करणार असेल तर गोरगरीबांच्या घरात अन्न-धान्य जाईल, याचीही व्यवस्था सरकारने केली पाहिजे. ठराविक काळासाठी दुकाने सुरू ठेवल्यास ग्राहकांची गर्दी होऊन आणखी करोना वाढण्याची भीती आहे.
– संतोष फडके, भाजी विक्रेता
आधीच्या लॉकडाऊनच्या चक्रव्यूहातून आम्ही अद्याप बाहेर पडलेलो नाही तोच दुसऱ्या लॉकडाऊनचे संकट घोंगावत आहे. सर्वसामान्य नागरिक कसा जगणार, गावी जाणे हा एकच पर्याय समोर असतो. मात्र मुलांचे शिक्षण लक्षात घेता ते देखील करता येत नाही. लॉकडाऊनऐवजी नियम कडक करून त्याची अमलबजावणी करावी.
– महेक रफीक काझी, व्यावसायिका