मुंबई – आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखन्यांना राज्य सहकारी बॅंकेकडून शासकीय हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पीक विम्याचा आग्रीम हप्ता 25 टक्के देता येईल का संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.
या बैठकीत आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बॅंकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इतरही निर्णय घेण्यात आले आहे. त्यापैकी एक निर्णय म्हणजे पुढील मंत्रिमंडळ बैठक ही मराठवाड्यात होणार आहे.
राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चा झाली. राज्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पीक विम्याचा आग्रीम हप्ता 25 टक्के देता येईल का संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
तसेच ज्या ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे त्या ठिकाणी चारा छावण्या, पिण्याचं पाणी आणि इतर पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
तत्पूर्वी पुढील मंत्रिमंडळ बैठक मराठवाड्यात होणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची समिती गठित करण्यात आली आहे.
16 सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काय निर्णय घ्यायचे या संदर्भात समिती अभ्यास करणार आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.