जळोची- बारामती मध्ये रेशनिंग धान्याचा, अपहार, काळाबाजार, किंवा साठा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रेशन दुकांनदारांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
रेशनिंगचे धान्य हा गोरगरीब जनतेचा घास आहे. कोणत्याही रेशनिंग दुकानदाराने रेशनिंग धारकांना धान्य कमी दिल्याचे आढळून आल्यास अथवा धान्याची चोरी केल्यास संबंधित रेशनिंग दुकांदारांचा परवाना रद्द केला जाईल. असा इशारा बरामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी दिला आहे.
बारामती तालुक्यातील भिलारवाडी येथील रेशनिंग धान्य दुकानदार यांनी रेशनिंग धान्याचा साठा केल्याप्रकरणी तहसीलदार विजय पाटील यांनी याची तत्काळ गंभीर दाखल घेऊन, रेशनिंग दुकानामधुन धान्याची चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार पाटील यांनी रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकांनदारांवर कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.
अशा दुकांदारांचे रेशनिंग परवाने रद्द करण्यात येणार आहेत. व नागरिकांच्या इतर तक्रारींची तत्काळ सुनावणी घेऊन संबंधित दोषी रेशनिंग दुकांनदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा शाखेकडून देण्यात आली आहे. करोनाच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब नागरिकांनी उपाशी राहु नये. यासाठी प्रशासनाकडून मोफत रेशनिंग धान्य दिले जात आहे.
अशा परिस्थिताही काही रेशनिंग दुकानदार धान्याचा काळा बाजार करत असल्याचे भिलारवाडी येथील रेशनिंग दुकानदार प्रकरणामुळे निदर्शनास आले आहे. गोरगरीब रेशनिंग धान्यधारक शासनाकडून मिळणाऱ्या आपल्या हक्काच्या मोफत धान्यासाठी धावपळ करीत आहेत. तर दुसरीकडे रेशनिंग धान्य दुकानदार गोरगरीब नागरिकांचे धान्याचा काळा बाजार करुन त्यांचे हक्काचे धान्य हिरावुन घेत आहेत.