पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या वारकरी आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. परंतु, अजित पवारांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकारण तापलं आहे.
यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका होते आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला.
अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहे. पण ते आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. महाराष्ट्र सरकारने विनंती पाठवली होती. पण ती केंद्र सरकारने नाकारली होती. देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना संधी द्यायची की नाही हा पंतप्रधान कार्यालयाचा प्रश्न आहे. मात्र विरोधी पक्षनेत्यांना संधी दिली जाते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान असून हे खूपच दुर्दैवी असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.