भारतीय संस्कृतीत नारळास खूप महत्व आहे. मुख्यत्वे देवाच्या पुजेसाठी त्याचा वापरह होतो. तसेच वेगवेगळ्या पदार्थांची चव सुधारण्यासाठीही ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. नारळाचं खोबर आपल्याकडे अनेक पदार्थात वापरलं जातं. नारळाची चटणी बनविण्यापासून ते तेल बनविण्यापर्यंत नारळाचे फायदे आहेत.
1.थायरॉइड फंक्शन – थायरॉइड फंक्शन जर योग्य पध्दतीने काम करत नसेल, तर आपल्या गळ्यात अनेक प्रकारचे रोग निर्माण होऊ शकतात. जे लोक नारळाचे जास्त सेवन करतात त्यांच्यात थायरॉइड फंक्शनची समस्या दिसून येत नाही.
2.नारळात ब्रेन बोस्टींगचे गुणधर्म आढळतात.
3.जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राखायाची असेल तर आवर्जून नारळाचे सेवन करा. कारण नारळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत.
4.गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती आणि बाळाचा रंग उजळतो.
5.नारळाच्या दुधात मॅगनीजचे प्रमाण अधिक असल्याने ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
6.खोबरेल तेलाने मेकअप काढला तर त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही.
7.हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम होते.
8.डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडत नाही.
9.नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित राहण्यास मदत होते.
10.शरीरात पाण्याची कमतरता, स्ट्रोक, हायपरटेंशन, किडनी स्टोन आजारांवर नारळाचे पाणी फायदेशीर ठरते.
11.शरीरातील कमी झालेले इलेक्ट्रोलाइट्स नारळपाणी पुनर्स्थित करते.
12.नारळात फायबर अधिक असल्याने ते खाल्ले तरी शरीरात कॅलरीज वाढत नाहीत.
13.नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची कखंटी हे सर्व महत्त्वाचं आहे.
डॉ आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.