पाटणा – उत्तर प्रदेशपेक्षा बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अधिक चांगली आहे, असे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी म्हटले आहे. अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एखाद्या आरोपीला रुग्णालयात नेले जाते आणि तेथे त्यांची हत्या होते हे सारे पूर्वनियोजीत आहे.
राज्यात गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, ते कोणाचाही हत्या करतात त्यातून उत्तर प्रदेशात आता कोणतीही कायदा सुव्यवस्था स्थिती राहिलेली दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील कालच्या प्रकाराबद्दल देशातील अनेक राजकीय पक्षांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तर या घटनेबद्दल थेट मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.