भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मर्यादित 20 षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज गयाना इथल्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त कुलदीप यादव याच्या जागी रवि बिश्नोई याला स्थान देण्यात आले आहे.
दोन्ही संघाचे Playing 11 पुढीलप्रमाणे :-
वेस्ट इंडीज :- ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.
भारत :- इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा यजमान संघानं पराभव केला होता. आता दुसरा सामना जिंकून पाच सामन्याच्या मालिकेत 1-1 बरोबरी करण्याचा प्रयत्न हार्दिक पांड्या आणि टीमचा असेल.