जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यापासून कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकाही पत्रकार परिषदेला उपस्थिती राखलेली नाही. यावरून उलट सुलट चर्चा होत होत्या. अखेर त्यावर बीसीसीआय व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपेल मौन सोडले आहे.
कोहलीला पत्रकार परिषद घेण्यापासून कोणीही रोखलेले नाही. तो या मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळेल तेव्हा हा सामना त्याचा शंभरावा कसोटी सामना असेल त्यापूर्वी तो माध्यमांशी पत्रकार परिषदेत संवाद साधेल, असा खुलासा द्रविडने केला आहे.
टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्यास निवड समितीने सांगितले होते तसेच एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून गेण्यापूर्वी केवळ एक तास आधी निवड समितीने फोन करुन माहिती दिल्याची खळबळजनक माहिती कोहलीने भारतात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर भारतीयस संघ दक्षिण आफ्रिकेत संघासह रवाना झाला मात्र, त्याने एकाही पत्रकार परिषदेत त्याने उपस्थिती राखली नाही. त्यावेळी कोहलीला पत्रकार परिषद घेण्यापासून बीसीसीआयने रोखले अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, हे सर्व वृत्त द्रविडने फेटाळून लावले आहे.
कोहलीच्या वक्तव्यावरुन जे वाद सुरु आहेत, त्यामुळे तो पत्रकार परिषद टाळत आहे का? असा प्रश्न द्रविड यांना विचारण्यात आला होता. त्यावर द्रविड यांनी हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे सांगितले.