नवी दिल्ली- केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेतली ही बैठक आटोपल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
The new draft proposal received from the Govt will be discussed in the meeting of Samyukt Kisan Morcha (SKM) today. Accordingly, the SKM will take a decision (regarding withdrawing the agitation): Ashok Dhawale, a member of SKM's five-member committee pic.twitter.com/5Xghlz1vNy
— ANI (@ANI) December 9, 2021
तत्पूर्वी, संयुक्त किसान मोर्चाच्या पाच सदस्यीय समितीचे सदस्य अशोक धावळे म्हणाले- सरकारकडून प्राप्त झालेल्या नव्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चातर्फे आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
मंगळवारी सरकारच्या प्रस्तावावर संयुक्त किसान मोर्चाच्या असहमतीनंतर केंद्र सरकारने बुधवारी नवा प्रस्ताव पाठवला होता. केंद्र सरकारने नव्या प्रस्तावात आंदोलकांवरील खटले तत्काळ मागे घेण्यासह एमएसपी समिती, तसेच सर्व शेतकऱ्यांना एमएसपी कसा मिळेल याची खात्री ही समिती ठरवेल, असे सरकारने स्पष्ट केले. भरपाई मान्य करताना वीजबिलाबाबत संसदेत आणण्यापूर्वी संयुक्त किसान मोर्चाशी चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
सरकारच्या नव्या प्रस्तावावर प्रथम संयुक्त किसान मोर्चाच्या पाच नेत्यांच्या समितीची नवी दिल्लीत बैठक झालीआणि त्यानंतर सीमेवर मोर्चासंबधी मोठ्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाबाबत सरकारने अधिकृत घोषणा केल्यानंतर संप मिटवण्याची घोषणा केली जाईल, असे शेतकरी नेत्यांनी जाहीर करताना सांगितले.