चेन्नई : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अत्यंत अतितटीच्या लढातीत महाराष्ट्राच्या श्रावणी वाळेकर आणि तारिणी सूरी यांनी उत्तराखंडच्या गायत्री रावत व मान्सा रावत यांचे आव्हान २१-१८, १६-२१, २२-२० असे मोडून काढताना बॅडमिंटनच्या मुलींच्या गटातील दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
पहिला गेम महाराष्ट्राने जिंकल्यानंतर उत्तराखंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करताना दुसरा गेम जिंकला. मात्र, तिसऱ्या गेममध्ये श्रावणी आणि तारिणी यांनी योग्य समन्वय राखताना आक्रमक खेळ करून सामना जिंकला.
मुलीच्या एकेरीच्या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या निशा भोयटेला आंध्र प्रदेशच्या टी. सूर्या चरिष्मा हिने १३-२१, १६-२१ असे पराभूत केले. यामुळे मुलीच्या एकेरीतील महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले आहे.